tag:blogger.com,1999:blog-3855011906496651216.post8511240650281675541..comments2023-08-03T19:14:15.582+05:30Comments on !! मुक्काम पोस्ट सह्याद्री !!: ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्यsagarshivade07http://www.blogger.com/profile/14669634490608268217noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3855011906496651216.post-29078373648622787192013-03-14T15:40:54.713+05:302013-03-14T15:40:54.713+05:30माझ्या नोकरीच्या आयुष्याशी कित्येक वर्षे अगदी अटळ ...<br /><br />माझ्या नोकरीच्या आयुष्याशी कित्येक वर्षे अगदी अटळ असा जोडलेला भाग म्हणजे आमची लाडकी लालपिवळी. खुद्द एस.टी.च्या कर्मचार्यांनी जेवढे प्रेम केले नसेल इतके मी एस.टी. वर [त्यात अर्थात साधी, निमआराम आणि एशियाड यांचा समावेश आहेच...डावेउजवे कधी केले नाही....] प्रेम केले आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर तर नित्याचाच प्रवास आणि आज जरी रस्ते चौपदरी आहे, उद्या सहा पदरी रस्ता झाला, तरी ज्या दिवसात एकपदरीच....म्हणजे नित्यनेमाने समोरून वाहने येजा करायची तो काळ... रस्ता होता त्याकाळी ड्रायव्हरमामाचे गाडी नेण्याचे कौशल्य पाहताना त्याच्याविषयी आदरमिश्रीत कौतुक मनी निर्माण होत असे. मी कधीही गाडीच्या अवस्थेविषयी तक्रार केली नाही.... कधी रस्त्यात रुसून जरी बसली तरी त्याबद्दल नापसंती दर्शविली नाही.... दरात कितीही फरक पडला तरी एस.टी. ही कायमपणे तोट्यात जाणारे व्यवस्थापन असूनही अथकपणे जनतेच्या सेवेसाठी तयार असते हे माहीत असल्याने एस.टी.कारभाराविषयी कधीही माझे मत 'डावे' होणार नाहीत. खाजगी व्होल्व्होजचे कुणी कितीही गुणगाण गावो, पण लालपिवळीला 'माहेरपणा'चा जो गंध आहे तो अन्य कुठल्याही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला येणे शक्य नाही.<br /><br />कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांची मुख्यालये तर राहू देतच पण येथील तालुका पातळीवरील ठिकाणी जात असताना मी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात [ऑफिसची सरकारी जीप नसताना] एस.टी. ने इतका प्रवास केला आहे की अक्षरशः डझनावारी कंडक्टर्स ड्रायव्हर्स यांच्या अगदी अरेतुरेच्या ओळखी तर झाल्याच होत्या पण कित्येक प्रसंगी त्यांच्या डब्यातील पिठलं भाकरी, मसाला भरून त्यांच्या आईने केलेली भरलेल्या वांग्याची चमचमीत भाजी, ओल्या मिरच्यांचा ठेचा....यांचा आनंदही घेतला आहे..... सायंकाळी एखाद्या तालुक्यातील काम संपले आणि एस.टी. सुटण्याची वेळ झाली तरीही सकाळी जाधव कंडक्टरला सांगून ठेवलेले असल्याने तो गाडी सुटण्याची नित्याची वेळ टळून गेली तरी बाकीच्या पॅसेन्जर्सना [त्याच्या भाषेत पाशिंजर] 'थांबा हो पावणं वाईच, आमचं ऑडिटवालं पाटीलसर येतील आता दोन मिन्टात...' असं सांगून बोलण्यात गुंतवून ठेवत असे. गाडीत बसलेल्या बर्याच लोकांना 'हे ऑडिटचे पाटीलसर' माहीतच असल्याने मग तेही तकार न करता, 'आस्सं व्हय, बरं बरं, थांबू या....' म्हणत नव्याने तंबाखू मळायला सुरुवात करीत..... ही खरी आपुलकी निर्माण होत गेली ती एस.टी.च्या नित्याच्या प्रवासामुळे.<br /><br />एस.टी. हे एक चालतेबोलते 'घर' च बनते ग्रामीण भागातून जाताना... [वर फोटोत दाखविलेल्या बसप्रमाणे]. हाय वे वरील गाड्यांमध्ये एकप्रकारचा 'बिझिनेस' पणा जाणवतो....कोल्हापूर-पुणे २७४ चे तिकिट टरकावून झाले की प्रवाशाचा आणि कंडक्टरचा संबंध संपला....तोही दरवाजा बंद करून ड्रायव्हरशेजारील सीटमध्ये जाऊन विसावतो...., पण ग्रामीण भागात लालपिवळी हे तुमच्या सुखदु:खाचे एक निश्चित ठिकाण बनते. एस.टी.च्या आवाजावरही ताण करीत कंडक्टरला सामील करून घेत मोठ्याने गप्पा हाणणारे रामभाऊ, संभाजीराव, जोतिबा, यल्लाप्पा, तुक्या आणि त्या कान देवून ऐकणार्या त्यांच्या डोईवरून पदर घेऊन अंग चोरून बसलेल्या कस्तुर्या..... वा ! संभाषणात भाग न घेताही मी कित्येक घरातील संसारांच्या भांड्यांचे विविध आवाज ऐकले आहेत. चालत्या गाडीत पोराच्या वागण्याने खंगलेले आईवडील जसे पाहिले तसेच पोरगीला त्रास देणारी सासू भेटली म्हणून डोळ्यातून पाणी काढणारी राधाक्काही पाहिली. जावयाच्याबाबतीत गणित पक्के जमल्याची खुशी जशी गणपतरावाच्या चेहर्यावर पाहिली तशीच धाकट्या भावाने वसंताने चारचौघात उसाच्या बिलावरून थोरल्याचा अपमान केल्यामुळे धक्का बसलेला यशवंताही पाहिला. असल्या दु:खावर खरे तर फुंकर घालायची नसतेच, कारण हे तर रोजचेच....पण इंग्रजीमध्ये ज्याला 'व्हेन्ट' म्हणतात त्यानुसार आपल्या वेदनेला कुठेतरी वाट करून दिल्याशिवाय मन मोकळे होत नसते.....<br /><br />....आणि असे मन मोकळे करून देणारी हक्काची एक जागा म्हणजेच एस.टी. ~<br /><br />श्री.सुज्ञ माणूस यानी अतिशय अचूकपणे घडवून आणलेला 'एस.टी.' चा प्रवास भावला असेच मी म्हणेन.<br /><br />अशोक पाटील<br />Anonymousnoreply@blogger.com